
मुंबई: मुंबई, मुंबई उपनगरे, ठाणे, आणि पालघर जिल्ह्यात रात्री पासून मुसळधार पाऊस सुरू असून येथील जनजीवन विस्कळीत झाले आहे. मुंबई उपनगरे, भिवंडी, मीरारोड, भाईंदर, वसईला पावसाने रात्रीपासून झोडपले असून या भागांमध्ये अनेक ठिकाणी पाणी साचले आहे. या भागांमधील अनेक रस्त्यांवरही पाणी साचले असून वाहनांना पाण्यातून वाट काढत पुढे जावे लागत आहे.
मुंबईत उपनगरांनाही मुसळधार पावसाने रात्रीपासून झोडपले असून पश्चिम उपनगरात अंधेरी, बोरीवली, कांदिवली मीरारोड तसेच ठाण्यातील कल्याण आणि डोंबिवली परिसरातही मुसळधार पाऊस कोसळत आहे.






