
अकोला: मुख्यमंत्री फडणवीस यांनी अकोला जिल्ह्यातील लाखनवाडा, चिखलगाव आणि म्हैसपूर या गावांमधील शेतकर्यांच्या शेतांमध्ये जाऊन पावसाने झालेल्या नुकसानीची आज पाहणी केली. ऑक्टोबरच्या पावसाने सोयाबीन, ज्वारी, कापूस, मूग अशा सर्वच प्रकारच्या पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं.
परतीच्या पावसामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय. शेतात पाणीच पाणी झाल्यानं पिकं पाण्यात गेलीय. मुख्यमंत्र्यांनी अकोल्याचा दौरा करत नुकसानाची पाहणी केली. पवासामुळे हाताशी आलेला हंगाम नष्ट झाला आहे. ओल्या दुष्काळाची स्थिती आहे. पण शेतकऱ्यांनी चिंता करू नये. त्यांना सर्व मदत केली जाईल, अशी ग्वाही फडणवीस यांनी दिली. पण यावेळी त्यांनी काळजीवाहू सरकारची अडचणही नमूद केली. काळजीवाहू सरकारला काम करताना अडचणी येतात. मात्र, राज्यात लवकरात लवकर सरकार स्थापन होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.






