भाजपचे मनोज पाटील यांनी उठविलेल्या आवाजाला यश…..बेकायदेशीर कामाला मनपा कडून स्थगिती.

भाजपचे मनोज पाटील यांनी उठविलेल्या आवाजाला यश…..बेकायदेशीर कामाला मनपा कडून स्थगिती.

विरार / दि. २९ ऑगस्ट : विरार पश्चिम बोळींज खारोडी येथील मेंफेयर हाऊसिंग ( विरार गार्डन) च्या सुरू असलेल्या संकुलासाठी 20 मीटर रुंद रस्ता बनवण्यासाठी महापालिकेने विकासकाला परवानगी दिली होती. सदर परवानगी देताना विविध अटी व शर्ती घालण्यात आल्या होत्या. त्या प्रामुख्याने १) अस्तित्वात असलेल्या नैसर्गिक खाड़ी प्रवाहाला कोणतीही बाधा येणार नाही तसेच २) रस्ता २० मीटर रुंदीचा असेल अशा प्रमुख अटी होत्या ; परंतु प्रत्यक्षात या सर्व शर्तीचे सर्रासपणे उल्लंघन करीत विकासक व ठेकेदार यांनी मनमानी करत खाड़ीपात्रात १५ ते १७ फूट भिंत उभारून अतिक्रमण करून भराव केला व त्यात रस्ता निर्माण करण्याचे काम सुरू केले.

यापूर्वीही खाड़ी किनारी असलेली पूर्ण वाढ झालेली जवळपास २२ झाडे बेकायदेशीरपणे काढून ती खाड़ी पात्रात अक्षरशः फेकण्यात आली.

या सर्व प्रकाराबाबत भाजपाचे वसई विरार जिल्हा उपाध्यक्ष मनोज पाटील यांनी समाज माध्यमातून वाचा फोडली व हा प्रकार महापालिका आयुक्त व संबंधित बांधकाम विभाग यांच्या नजरेस आणून दिला व तातडीने कारवाईची मागणी केली. या विषयाचे गांभीर्य लक्षात घेऊन तातडीने काम थांबवण्याची लेखी नोटीस बांधकाम विभागामार्फत देण्यात आली.

विरार महापालिकेची नोटिस

इतक्या मोठ्या प्रमाणात खाडीमध्ये अतिक्रमण व भराव तसेच परवानगीचे उल्लंघन होत असतांनाही महापालिका बांधकाम विभागाचे अधिकारी तसेच महसूल प्रशासन नक्की काय करत होते? असा प्रश्न मनोज पाटील यांनी उपस्थित केला. या वर्षी बोळींज खारोडी ते जकात नाका रस्ता अनेक दिवस पाण्याखाली गेला होता. वसई विरार मधील हा एकमेव रस्ता पाण्याखाली होता याचे प्रमुख कारण हे खाड़ी मधील भराव हे होते.

मनोज पाटील यांचा रिपोर्ट

या सर्व प्रकरणात खाड़ी पात्रातील भिंत तसेच भराव तातडीने काढून टाकण्यात यावा तसेच दोषी ठेकेदार बिल्डर व महापालिका बांधकाम विभागातील अधिकाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करावी व दिलेली परवानगी रद्द करावी अशी मागणी मनोज पाटील यांनी केली आहे.