कलम 370 हटवणार; मिशन काश्मीर यशस्वी

नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांच्या टीम ने आज मास्टर स्ट्रोक खेळत कलम 370 हटवण्याचं जाहीर केले. भारताच्या इतिहासात सर्वात मोठा निर्णय असून सरकारच्या या निर्णयाचं विविध ठिकाणी स्वागत होत आहे.

या ऐतिहासिक आणि धाडसी निर्णयामुळे जम्मू काश्मीर चा विशेष राज्य दर्जा संपुष्टात येणार आहे. 72 वर्षांनंतर वादग्रस्त कलम 370 मधून जम्मू काश्मीरची सुटका होणार आहे. यामुळे जम्मू काश्मीरमधील जनतेला देशातील इतर जनातेप्रमाणे कायद्याचा अधिकार प्राप्त होणार आहे. तसच जम्मू काश्मीर मध्ये उद्योग धंदा वाढून तेथील जनतेला रोजगार निर्मिती होणार आहे. याचबरोबर जम्मू आणि काश्मीर असं विभाजनाचा प्रस्ताव मंजूर करण्यात येणार आहे. जम्मू काश्मीरचा पुनर्रचनेचा प्रस्ताव मांडला जाणार आहे. लडाख जम्मू काश्मीर पासून वेगळं होणार असून केन्द्र शासित प्रदेश असणार आहे. बसपा कडूनही सरकारच्या या निर्णयाला पाठिंबा दर्शविला आहे. देशभरातून सरकारच्या या निर्णयाचं फटाके लावून स्वागत करण्यात आले. राज्यसभेत याविधेयकावर चर्चा सुरू असून लवकरच अधिकृत घोषणा करतील अशी माहिती आहे.

राज्यसभेत शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी गृहमंत्री अमित शहा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या या धाडसी निर्णयाचे स्वागत केले आहे. तसेच शिवसेना या निर्णयाच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे असे सांगितले.

पीडीपी ने मात्र याला विरोध दर्शविला आणि पीडीपीच्या खासदाराने राज्यसभेत गोंधळ घातला.

तीन मोठे निर्णय

  1. कलम 370 रद्द होणार आहे.
  2. लडाख जम्मू काश्मीर पासून वेगळं होणार (काश्मीर पुनर्रचना प्रस्ताव)
  3. जम्मू काश्मीर केन्द्रशासित होणार

जम्मु काश्मीर — 370 रद्द आणि परिणाम
°°°°°°°°°°°°°°°°
★धारा 370 रद्द.
★आर्टीकल 35 अ रद्द.
★आता जम्मु काश्मीर राज्य नाही राहीले.
★जम्मु व काश्मीर घाटी केंद्र शासीत प्रदेश.पण विधानसभा राहणार.
★लडाख वेगळे केंद्रशासीत प्रदेश.बिना विधानसभा.
★काश्मीरचा विशेष दर्जा रद्द.
★काश्मीरचा वेगळा झेंडा रद्द.आता एकच भारतीय झेंडा.
★काश्मीरी व भारतीय असे दुहेरी नागरिकत्व रद्द.आता फक्त भारतीय नागरिकत्व लागू.
★जम्मु-काश्मीर व लडाखला आता स्वतंत्र ऊपराज्यपाल राहणार.
★जम्मु काश्मीर व लडाखला स्वतःची पोलीस यंत्रणा नसणार.आता केंद्रीय पोलीस राहणार.
★आता जम्मु काश्मीर व लडाख मध्ये सर्व भारतीय कायदे लागु.वेगळा कायदा नाही.
★जम्मु काश्मीरची वेगळे संविधान रद्द.आता फक्त भारतीय संविधान लागू.

सौजन्य: ए बी पी न्यूज