
हिंगणघाट वर्धा : वर्ध्यातील हिंगणघाट जळीतकांड पीडितेची झुंज अपयशी ठरली. सोमवारी (10 फेब्रुवारी) अत्यंत शोकाकुल वातावरणात दारोडा गावाने आपल्या लेकीला निरोप दिला. वडिलांनी पीडितेच्या पार्थिवाला अग्नी दिला. अंत्यसंस्कारासाठी मोठ्या प्रमाणात ग्रामस्थ आणि इतर लोक उपस्थित होते. अंत्यसंस्काराआधी नातेवाईकांनी लेखी आश्वासन मिळत नाही तोपर्यंत अंत्यसंस्कार करणार नाही अशी भूमिका घेतली होती. अखेर जिल्हाधिकाऱ्यांनी लेखी आश्वासन दिल्यानंतर अंत्यसंस्कार करण्यात आले आहेत.






