आशिया चषक स्पर्धेच्या आयोजनाची तारीख जाहीर, भारत आणि पाकिस्तान पुन्हा भिडणार

आशिया कप 2022 च्या आयोजनाची तारीख निश्चित झाली आहे. शनिवारी कोलंबो येथे झालेल्या आशियाई क्रिकेट परिषदेच्या बैठकीत याला मान्यता देण्यात आली. ही स्पर्धा श्रीलंकेत आयोजित केली जाणार आहे आणि ती T20 फॉरमॅटवर खेळवली जाईल. स्पर्धेचे सामने ऑगस्ट-सप्टेंबरमध्ये होणार आहेत. भारत आणि पाकिस्तान हे दोन्ही संघ या स्पर्धेत उतरणार असल्याने सर्वांच्या नजरा या स्पर्धेकडे लागल्या आहेत. T20 विश्वचषक 2022 या वर्षी होणार आहे. या ICC स्पर्धेसाठी भारत आणि पाकिस्तान (IND vs PAK) या दोन्ही संघांना एकाच गटात ठेवण्यात आले आहे.