न्यूझीलंड कडून दुसऱ्या वनडेतही भारत पराभूत, सिरीज गमावली

ऑकलंड: न्यूझीलंडविरुद्धच्या दुसऱ्या वनडे सामन्यात भारताचा २२ धावांनी पराभव झाला. यासह भारतीय संघाने ३ सामन्यांची मालिका देखील गमावली. आघाडी आणि मधल्या फळीतील फलंदाजांनी निराशा केल्यानंतर रविंद्र जडेजा भारताच्या विजयासाठी संघर्ष केला परंतु अपयशी ठरला. आजच्या भारताच्या पराभवाने न्यूझीलंड संघाने तीन सामन्याची मालिका जिंकली आणि टी 20 मालिका पराभवाचा वचपा काढला.

आघाडी आणि मधल्या फळीतील फलंदाजांनी निराशा केल्यानंतर रविंद्र जडेजा भारताच्या विजयासाठी संघर्ष केला पण त्याला यश आले नाही. न्यूझीलंडने प्रथम फलंदाजी करत भारतासमोर विजयासाठी २७४ धावांचे आव्हान ठेवले होते. पण भारताचा डाव २५१ धावांवर संपुष्ठात आला.

ऑकलंड येथील ईडन पार्कवर भारताचा कर्णधार विराट कोहलीने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. न्यूझीलंडने शानदार सुरूवात केली. मार्टिन गप्टिल आणि हेन्री निकोलस यांनी पहिल्या विकेटसाठी ९३ धावांची भागिदारी केली. चहलने निकोलस याला ४१ धावांवर बाद कर भारताला पहिला धक्का दिला. त्यानंतर गप्टिल आणि ब्लंडेल यांनी संघाला १५०च्या जवळ पोहोचवले. तेव्हाच ब्लंडेलला शार्दुलने बाद केले. त्यानंतर एक चोरटी धाव घेण्याच्या प्रयत्नात गप्टिल धावाबाद झाला. त्याने ७९ धावा केल्या. त्यानंतर न्यूझीलंडचा डाव कोसळण्यास सुरुवात झाली. गप्टिल बाद झाला तेव्हा न्यूझीलंडची अवस्था ३ बाद १५७ अशी होती. त्यानंतर भारतीय गोलंदाज आणि क्षेत्ररक्षकांनी न्यूझीलंडची अवस्था ८ बाद १९७ अशी केली. अखेरच्या षटकात रॉस टेलर आक्रमक खेळ केला त्याला काईल जेमीसन चांगली साथ दिली. टेलरने नाबाद ७३ धावा केल्या. टेलर-जेमीसन जोडीने नवव्या विकेटसाठी नाबाद ७६ धावांची भागीदारी केली. ऑकलंड मैदानावर आणि न्यूझीलंडकडून नवव्या विकेटसाठीची ही सर्वोच्च भागीदारी ठरली.भारताकडून यजुवेंद्र चहलने सर्वाधिक ३ विकेट घेतल्या. तर जसप्रीत बुमराहने २ आणि रविंद्र जडेजाने एक विकेट घेतली.