
राज्यातील विद्यार्थी आणि पालकांचे लक्ष लागून राहिलेल्या १०वी आणि १२वीच्या विद्यार्थांसाठी अतिशय महत्वाची बातमी आहे. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता १०वी आणि १२ वीची परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी ही घोषणा केली आहे. आता १२वीची परीक्षा मे महिन्याच्या अखेरीस तर १०वीची परीक्षा जून महिन्यात होणार आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांची बैठक पार पडली होती. या बैठकीला उपमुख्यमंत्री अजित पवार देखील उपस्थित होते. यावेळी १०वी आणि १२वीच्या परीक्षा घ्यायच्या की नाही, यावर बराच वेळ चर्चा केल्यानंतर अखेर परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.











