
भारतामध्ये वाढत्या कोरोना रूग्णांच्या संख्येमुळे आता आयपीएल 2021 चा संपूर्ण सीझन रद्द करण्यात आला आहे. चार विविध आयपीएल टीम्स (IPL) मधील खेळाडू हे कोरोनाबाधित असल्याचं आढळले आहेत. काही सामने लांबणीवर टाकण्याची चर्चा सुरू असतानाच आता IPL 2021 संपूर्ण सीझन गुंडाळल्याची माहिती BCCI चे Vice-President Rajeev Shukla यांनी दिली आहे.
CSK चा बॉलिंग कोच एल बालाजी, वरूण चक्रवर्ती आणि संदीप वारियर हे खेळाडू काल तर सनराइजर्स हैदराबाद मधील खेळाडू Wriddhiman Saha याला कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे ही संसर्गाची साखळी पुढे वाढू नये म्हणून आता खबरदारीच्या दृष्टीने तात्काळ यंदाचा सीझन तात्काळ रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
दरम्यान भारतात कोविड 19 च्या गंभीर आरोग्य संकटामध्येही आयपीएल सामने खेळवले जात असल्याने अनेक क्रिकेट जगतातून टीका होत होती. तर काही परदेशी खेळडूंनी आयपीएल मधून वॉकआऊट करत पुन्हा मायदेशी परतण्यास सुरूवात केली होती. त्यामुळे आता अखेरीस हा सीझन रद्द झाला आहे.











