
ऑस्ट्रेलियाचा (Australia) 3 विकेटने दणदणीत विजय मिळवत टीम इंडियाने (Team India) ब्रिस्बेनच्या गब्बा (Gabba) येथील अंतिम टेस्ट सामना जिंकला आणि बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी (Border-Gavaskar Trophy) कसोटी मालिका 2-1 अशा खिशात घातली. भारतीय संघाने सलग दुसऱ्यांदा कांगारू देशात मालिका जिंकण्याचा पराक्रम केला आहे. अॅडिलेड सामन्यात पराभूत झाल्यावर भारतीय संघाने (Indian Team) मेलबर्नमध्ये जोरदार कमबॅक केलं आणि मालिकेतबरोबरी साधली. त्यानंतर सिडनी टेस्ट अनिर्णीत राहिल्यावर अखेरीस संघाने ब्रिस्बेनमध्ये ऐतिहासिक विजय मिळवला. वॉशिंग्टन सुंदर, शार्दूल ठाकूर, मोहम्मद सिराज, शुभमन गिल (Shubman Gill) आणि रिषभ पंत (Rishabh Pant) संघाच्या विजयाचे शिल्पकार ठरले. सुंदर-शार्दूलने पहिल्या डावात संघाचे आव्हान कायम ठेवले तर सिराजने 5 कांगारू फलंदाजांना बाद करत विरोधी संघाला मोठी आघाडी घेऊ दिली नाही. त्यानंतर शुभमनच्या 91 धावांनी संघाला विजयाच्या जवळ नेले तर पंतच्या नाबाद 85 धावांच्या जोरावर टीमने ऐतिहासिक विजय मिळवला.











